Wednesday, October 2, 2013

अश्विन नवरात्री पूजन /होम


अश्विन नवरात्री घटस्थापना :१ चौरंग किंवा पाट,पाटावर पिवळे वस्त्र,त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू,त्यावर तांब्याचा कलश,कलशात तांदूळ किंवा गहू भरणे त्यावर तांब्याचे ताम्हण व ताम्हणात अक्षता ठेवणे त्यावर आपल्या प.पु.नंदाईचा फोटो ठेवणे.रोज दिपारती करणे.

" ॐ आल्हादिन्ये नंदाए संधीने नमो नमः ||"
हा जप १०८ वेळा करून रोज चिदानंदा उपासना करणे.

हे गहू / तांदूळ नंतर अन्नपूर्णा प्रसादम ला द्यावेत .नवरात्रीत आपण श्री राम रसायन तसेच मातृवात्सल्य विदानम ग्रंथाचे पठण करू शकतो.

--------------------------------



ललिता पंचमीसुर्योदया पूर्वी सदगुरुंचा फोटो घरामध्ये सर्वत्र फिरवून फोटोंच्या ठिकाणीच ठेवावा.
पुरणाचा ( मुगाच्या डाळीचे पुरण ) नैवेद्य अर्पण करावा.
प.पु.बापूंचा फोटो फिरवताना खालील जप करावा.

"ॐ श्रेष्ठा स्मृतीच शुद्ध सर्व विद्या नमो नमः
शुभकार्या अधिष्ठात्री सीता फलदायिनी
नित्यस्वरूपा नित्यशुद्धा इच्छा कृतीवर्धिनी "


त्यानंतरची प्रार्थना- " हे माते तू सर्व जगताची तारिणी आहेस.तू इच्छापूर्तीवर्धिनी आहेस.तू थोडेतरी स्मृती मला दे.ती मिळालेली स्मृती मी माझ्या जीवनात वापरेन."
ह्यावेळी प.पू.बापूंचा जप (२४/५४/१०८ वेळा) करावा. 

-----------------------------------



अष्टमीचा होम

साहित्य : तांदूळ , ताम्हण , कापूर


कृती :

सूर्यास्तानंतर तांदुळाने स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेवणे ,
ताम्हणात २ मुठभर तांदूळ पसरावेत .
त्यावर मग मधोमध एक व ८ बाजूला ८ असे नऊ कापूर वड्या ठेवून , पहिल्या मधल्या कापराने अग्नी प्रज्वलित करावा.
अश्या प्रकारे ताम्हनात कापूर प्रज्वलित करावेत.


प्रार्थना :
" सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ."


जप : १ .ॐ श्री आदिमाता नमोस्तुते
2. ॐ श्री अनिरुद्धाय नमो नमः
3. ॐ श्री आल्हादिन्ये नंदाये संधीन्ये नमो नमः
4. ॐ श्री विश्वम्भरा तुळजा गुणसारिता नमो नमः .

जपसंख्या : २७ , ५४ , १०८ .

प्रत्येक वेळी एक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे . जप संपेपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा.जप झाल्या नंतर साष्टांग नमस्कार घालावा .मग ताम्हण उचलून बाजूला करून स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हणात ठेवणे .
हे तांदूळ दसर्यापर्यंत देव्हार्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसर्याच्या दिवशी विसर्जन करणे .


Here Iam Posting Importance Of Ashwin Navratri(Ashubhanashini Navratri).

For Clear View Click FullScreen Or Visit Link





Saturday, May 18, 2013

"न्हाऊ तुझिया प्रेमे" या कार्यक्रमाविषयी


सकाळी ११ वाजल्यापासून ’प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर सर्व श्रद्धावानांचीबसण्याची व्यवस्था करण्यात आली आहेफक्त काही निमंत्रीकांसाठी राखीव खुर्च्यांची व्यवस्थाकरण्यात आली आहे
सर्व श्रध्दावानांनी उशीरात उशीरा दुपारी :१५ वाजेपर्यंत आपापल्या जागेवर स्थानापन्न होणेआवश्यक आहे

श्रद्धावान भक्त आपल्याबरोबर स्वत:च्या जेवणाचा डबा आणू शकतात.

सर्व श्रद्धावानांनी शक्यतो आपल्या जवळ मोठ्या पाण्याच्या बाटल्या ठेवाव्यातजेणेकरूनपाणी भरण्यासाठी सतत बाहेर जावे लागणार नाही.

मे महिन्यात कडक उन असल्यामुळे सर्व श्रद्धावानांनी सत्संगाला येताना आपल्याबरोबरटोपीगॉगलपाण्याची बाटलीगोळ्या-बिस्कीटे बरोबर ठेवावीत.

प्रवेशिका धारकांनी कार्यक्रमाला येताना फक्त त्यांच्या प्रवेशिका आणि जागेचा आराखडाआणावा.

बसेस घेऊन येणार्या श्रद्धावानांसाठी त्यांच्या बसेस कोठे पार्क करायच्या याची माहितीलवकरच मॅप द्वारे सर्व केंद्रांना कळविण्यात येईल.

जी उपासना केंद्रे बस करून येणार आहेत त्यांनी आपण किती बसेस आणणार आहोतते nhautujhiyapreme@gmail.com या ईमेल आय.डीवर ताबडतोप कळवावे तसेच त्यात्या बस कोऑर्डिनेटर ची नावे  फोन नंबर सुद्धा त्यामध्ये नमूद करावेत

मुंबई बाहेरील श्रद्धावानांनी कृपया त्यांचे सामान त्यांच्या बसमध्येच ठेवावेसिक्यूरिटीच्यादृष्टीने सामान आत नेणे शक्य होणार नाहीयाची कृपया नॊंद घ्यावी

कार्यक्रमाला येणार्या श्रद्धावानांसाठी दुपारच्या  रात्रीच्या जेवेणाची अत्यंत वाजवी दरातव्यवस्था केलेली आहे.

१०सर्व श्रद्धावानांसाठी दिवसभर पिण्याच्या पाण्याची  खाद्यपदार्थांची अत्यंत वाजवी दरातसोय करण्यात आली आहे.

११ग्राऊंडमध्ये बसणार्या श्रद्धावानांनी आपला डबा वा इतर खाद्यपदार्थ ग्राऊंडच्या बाहेरखावेतते ग्राऊंडमध्ये आणू नयेत.

१२स्टेडियम मधील प्रत्येक स्टॅंड / पॅवेलियन च्या पायथ्याला स्त्रीया  पुरुषांसाठी प्रसाधनगृहेउपलब्ध आहेत.

Also See This Video Where "Pujya. Samir Dada Giving Instructions About The Programme.


For Updates Of The Programme Join - >   Facebook Page Of "Nahu Tujhiya Preme"


Saturday, April 27, 2013

बापूंची सांगली भेट


सांगलीकर व पश्चिम महाराष्ट्रातील श्रध्दावान बापूभक्त तर अक्षरशः बापूंच्या आगमनाचे तास मोजायला लागले असतील एव्हाना. २७ एप्रिलला सकाळी बापू सांगलीच्या दौर्‍यावर हॅपीहोमहून निघतील. त्याच दिवशी संध्याकाळी बापू सांगलीला पोहचतील. बापूचंते पहिलं दर्शन नक्कीच त्यांच्या श्रध्दवान मित्रांना अत्यानंददायी तर असेलच शिवाय बापूंच पहिलं पाऊल सांगलीत पडताच ह्या त्यांच्या मित्रांच्या आनंदाला उधाण येईल.. त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.. बापू सांगलीत १ मे पर्यंत असतील.
१) शनिवार, २७ला आगमनासरशीच बापूंच स्वागत सांगलीतील टिळक चौकात सांगली, मीरज, कुपवाड व जवळच्या भागांमधील श्रध्दावान बापूभक्त करणार आहेत. बापू साधारण ५ ते ५:३०च्या दरम्यान टिळक चौकात पोहचतील.
२) त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवार, २८ एप्रिल हा दौर्‍यातील ‘श्रीअनिरुध्द आनंदोत्सवाचा‘ मुख्य सोहळ्याचा दिवस असेल. ह्यादिवशी संध्याकाळी ५ वाजता बापूंचं प्रवचन होईल व त्यानंतर २० ते २५ मिनटे गजर होतील आणि त्यानंतर सर्व श्रध्दावान बापूभक्तांना सद्‌गुरुंचं दर्शन घेता येईल. हा संपूर्ण सोहळा सांगलीतील ’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम’, खणभाग येथे पार पडेल. या कार्यक्रमासाठी अथांग भक्तसागर बापूंचे बोल व त्यांच्या बरोबरचा प्रत्येक क्षण साठवायला आतूर होऊन येईल ह्याची मला खात्री आहे.
३) तीसर्‍या दिवशी म्हणजे सोमवार, २९ एप्रिलच्या संध्याकाळी बापू स्वत: सर्व कार्यकर्त्यांबरोबर सत्संगात भाग घेतील.
४) मंगळवार, ३० एप्रिल म्हणजेच चौथ्यादिवशी दुपारी श्रीरेवणनाथ ह्यांचे स्थान म्हणजेच श्रीक्षेत्र रेवणसिध्द‌ येथे दर्शनासाठी निघतील. विटा येथील नगर परिषदेने बापूंना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे. ह्या आमंत्रणाचा मान राखून बापू श्रीरेवणसिध्द‌ला जातानाच विटा येथेही सदिच्छा भेट देतील. श्रीरेवणसिध्द‌हून दर्शन आटोपून येताना बापू विटा येथे तेथील आमदार मा. श्री. सदाशिवभाऊ पाटील व माजी-नगराध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. वैभव पाटील यांच्या आमंत्रणाने ’आदर्श इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड रीसर्च सेंटरला’ देखील सदिच्छा भेट देणार आहेत.
५) शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार, १ मे २०१३ला बापूं श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेतील. येथे श्री. वेंकटरमन दिक्षीत शास्त्री यांच्या आमंत्रणाचा मान राखून बापू, ‘सद्‌गुरु स्वामी नारायणानंदतीर्थ सेवा ट्रस्ट’ला भेट देतील.
मित्रांनो श्रीसाईसच्चरितातील “उतू चालला आहे खजीना…” हे शब्द अक्षरश: माझा मनात आतापासूनच नाद करु लागले आहेत. सद्‌गुरु बापूंची सांगली, विटा, रेवणसिध्द‌ व औदुंबर ह्या ठिकाणची भेट म्हणजे खरोखरच तेथील श्रध्दावान बापूभक्तांसाठी अत्यंत मोठा खजीनाच असेल ज्याचा ठेवा ते आयुष्यभर जपतीलच; पण मुख्य म्हणजे बापूंनाच आपल्या जीवनात उतरवून आपल्या संपूर्ण आयुष्यच सफल करुन घेण्याची सोय ह्या पाच दिवसात त्यांच्या श्रध्दावान मित्रांसाठी बापूंनी ओतप्रोत करुन ठेवली आहे ह्यात शंकाच नाही.
ll हरि ॐ ll


All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected